गुरुवार, २२ जून, २०१७

ज्ञानेश्वर माउली याचं उत्तर कुठे शोधू ?

ज्ञानदेवांनी विठूला स्पृश्य-अस्पृश्याच्या दलदलीतून मोकळं करण्यासाठी बंड केला. या दलदलित लोकशाहीचं बीज पेरण्याचं काम केलं. प्रसंगी लेखणीला तलवार करून अनिष्ट रुढी परंपरेवर आसूड आेढले. गवळणींच्या विरहातून जगण्याकडे रसिकेने पाहायला शिकवले. माउली प्रतिभेचे धनी होते. समाजातील विषमता, शोषण यांची त्यांना जाणीव होती. पण, एवढ्या प्रतिभासंपन्न प्रगल्भ, आशावादी, रसिक माणसानं एकाएकी अन् तेही एेन तारुण्यात खरंच समाधी घेतली असेल? की पानसरे-दाभोळकरांप्रमाणे त्यांचाही 'तुकाराम' केला गेला असेल? माउली तुमचा अतोनात छळ झाला, हे सांगितलं जातं. मात्र, त्यानंतर नेमकं काय झालं हा विचार अस्वस्थ करतो. निश्चितच ज्याला भाबडे वारकरी समाधी म्हणतात ती आत्महत्या करणारे पळपुटे तुम्ही नव्हता. तुम्ही निडर होता. याचे संदर्भ आजही तुमच्या आेवीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा