शनिवार, १७ जून, २०१७

शेतकरी संप

शेतकरी संपाच्या मागे विरोधक असल्याचा अारोप सत्ताधारी अाणि त्यांचे समर्थक करत होते. त्यात पूर्णत: नव्हे पण 'तत्वत:' तथ्य अाहे. पण, अाता सत्ताधार्‍यांनी केलेली कर्जमाफीची घोषणा अाणि शेतकर्‍यांप्रति यापूर्वी ओकलेली गरळ यामुळे अापसुकच कर्जमाफीचे श्रेय 'पूर्णत:' विरोधकांकडे जाते. पवारांनी शेतकरी संपाची गुगली टाकली, असे ओरडून अाणि पोस्टी फिरवून भाजपनेच महाराष्ट्रभर उर बदडवून घेतला. शिवाय ते तिला नो बाॅल नो बाॅलही म्हणत होते. परंतु, फडणवीसांना त्याच गुगलीवर तूर्त तरी बोल्ड व्हावे लागले. एकप्रकारे भाजपमुळेच कर्जमाफीचे श्रेय विरोधकांना मिळाले अाहे. मात्र, शेतकर्‍यांनी हुरहुरूळून जाण्याची गरज नाही. 'तत्वत:' या शब्दांअाड कायदेशीररीत्या असंख्य पळवाटा अाहेत. त्यामुळे पूर्णत: कर्जमाफी होईल की नाही याची शास्वती नाही. तोपर्यंत सरकारच्या विरोधात असेच जोरकसपणे लगे रहो! कारण विरोधक अाणि सत्ताधारी भाई-भाईच अाहेत. खरा विरोधी पक्ष सोशल मीडियाच अाहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा