मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१३

अभंग


ग दाटून आले होते. तो एकटाच गच्चीवर बसला होता. स्वतःच स्वतःच्या तंद्रीत. कितीतरी वेळापासून. एवढ्यात मोबाईल वाजला. नंबर अनोळखी. कुणाचा कॉल असावा, असे प्रश्नार्थक भाव त्याच्या चेह-यावर आले. त्याने कॉल घेतला. पलिकडून थोडासा कातर पण गोड आवाज आला. ‘‘कसा आहेस?'' क्षणभर तो गोंधळून गेला. कोण आहे ही? अन् एवढ्या जिव्हाळ्याने का विचारतेय? एका क्षणात सारे सारे प्रश्नच प्रश्न. वेगानं तो फ्लॅशबॅमध्ये गेला. अचानक त्याला क्लिक झालं. अन् तोही ओल्या आवाजात म्हणाला, ‘‘तू सोडून गेली तेव्हा होतो तसाच!'' क्षणभर दोघंही निशब्द झाले. कुणीच बोललं नाही. दोन वर्षांनंतर हो दोनच वर्षांनंतर पहिल्यांदा त्यांचं बोलणं होत होतं. कोण आनंद झाला त्याला. तीच पुन्हा बोलती झाली. ‘‘ मला वाटलं होतं तू नंबर बदलला असशील''. तो - ‘‘कसा बदलणार? बदलला असता तर माझा नवीन नंबर तुला कोण देणार होतं?''ती - हूँऽतो- ‘‘मला खात्री होतीच की तू कधी ना कधी कॉल करशील. तुझ्यासाठीच हा नंबर सुरू ठेवलाय मी.'' दोघांनाही हे अजिबात अनपेक्षित नव्हतं. ती म्हणाली, ‘‘मला तुझी खूप आठवण येतेय; पण काय करणार? आता भेटणं शक्य नाही.''तो - ‘‘हूँऽ कशी आहेस? नवीन काही''ती - जगतेय चार भिंतीच्या जगातच. अस्तित्व हरवून. तो- ....ती - ''मला मुलगा झालाय. काय नाव ठेऊ?''त्याचा आवाज अजून खोल गेला. तो म्हणाला, ‘अभंग' ठेव. एवढ्यात कुणाचा तरी आवाज आला, ‘‘अगं बाळ रडतंय. त्याला पाजायचं सोडून तिकडच्या खोलीत का करतेस?'' घाईघाईत तिने कॉल कट केला. तो मात्र विचारात गडून गेला. ‘अभंग' स्मृतींना उजाळा देत... आता आभाळ अधिकच आंधारलं होतं. क्षणात धो-धो कोसळेल असं.

- विकास वि. देशमुख 

करडा, ता. रिसोड, जि. वाशीम.

Vikas V. Deshmukh
Karda, Risod, washim.

1 टिप्पणी: