बुधवार, १२ फेब्रुवारी, २०१४

साहित्य क्षेत्रातील ‘एकलव्य’च !

गाव -खेड्यात कसदार लिखाण करणारे अनेकजण आहेत, पण योग्य मार्गदर्शन, व्यासपीठाचा अभाव यामुळे त्यांचे साहित्य समाजासमोर येतच नाही. स्वाभाविकच फुलण्याआधीच त्यांच्यातला साहित्यिक कोमेजून जातो. हे टाळण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील रिसोड या आडवळणाच्या गावात चाफेश्वर गांगवे या केवळ
साहित्यासाठी जगणाºया युवकाने जून 2000 मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी साहित्य चळवळ उभी केली.
रिसोडच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय पहिल्या साहित्य
संमेलनाचे अध्यक्ष होते कवी कैलास भाले या चळवळीचे सदस्यसुद्धा चाफेश्वरप्रमाणेच काव्यवेडे,
साहित्य रसिक, कुणाचेही मार्गदर्शन नसलेले, ध्येयासक्त. या सगळ्यांनी मिळून आपल्या संघाला ‘एकलव्य’ हे दिले. आपल्यासारख्या समवयस्क साहित्यिकांचे कौतुक व्हावे, त्यांना प्रेरणा मिळावी, या हेतूने सलग पाच वर्षे राज्यस्तरीय काव्य स्पर्धा घेतली. त्यासाठी ‘एकलव्य’ला अश्व प्रकाशनाचे संचालक राजा वाठोरे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या स्पर्धेला महाराष्टÑभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतून पहिल्या येणाºया तीन कवींच्या कवितेला ‘एकलव्य राज्यस्तरीय काव्य पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. त्यासाठी रिसोड येथेच दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन घेण्यास सुरुवात केली. एकलव्यच्या पहिल्या
संमेलनाचे अध्यक्ष जालना येथील कवी कैलास भाले होते. अकोल्याचे साहित्यिक सुरेश पाचकवडे हे दुसºया
संमेलनाचे अध्यक्ष होते. पुढे भगवान ठग, शेषराव पिराजी धांडे, रा. मु. पगार यांसारख्या दिग्गजांना एकलव्यच्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान
मिळाला. 
यंदा पुन्हा एकलव्यला उभारी देणारी
दरम्यान, दोन प्रातिनिधिक काव्यसंग्रहसुद्धा प्रकाशित केले. हे करत असताना मुख्य अडचण होती ती आर्थिक. मात्र, शिवाजी शिक्षण संस्थेने प्रत्येक साहित्य संमेलनासाठी आपले सभागृह मोफत उपलब्ध करून दिले. शिवाय संमेलनाला लाभलेल्या स्वागताध्यक्षांनीही आर्थिक मदत केली. मागील दोन वर्षांपासून रिसोडमध्ये एकलव्यचे साहित्य संमेलन झाले नाही, परंतु या वर्षी पुन्हा नव्या जोमाने एकलव्यला उभारी देण्याचे या संघाच्या सदस्यांनी ठरवले आहे. येत्या काही महिन्यांतच आठवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन भरवण्याचेही नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. एकलव्यच्या जडणघडणीत विष्णू जोशी, ग. ना. कांबळे,
प्रमोद तुरेराव, केशव गरकळ, दत्ता शेळके, सतीश अवचार, वसंता जुमडे, प्रकाश धांडे, विठ्ठल सरनाईक यांचेही योगदान आहे. 
एकलव्यमधून ख्यातकीर्त झालेले नवोदित
एकलव्यला नवोदित आणि प्रस्थापित हा भेदच मान्य नसल्याचे या संघातील प्रत्येक सदस्य सांगतो. साहित्य लिहिण्यासाठी लिखाणाचा अनुभव नव्हे तर प्रखर सामाजिक जाणीव हवी असते हेच एकलव्य साहित्य संघाचे सूत्र आहे. आपल्या पहिल्याच काव्यसंग्रहाने नामदेव ढसाळ, नारायण कुळकर्णी कवठेकर हे कवी महाराष्टÑाचे लोकप्रिय साहित्यिक झालेत, हे जाणकारांना माहीत आहे. कवी अनिल कांबळे यांचा ‘झोपडी
नंबर बारा’ हा कवितासंग्रह येण्यापूर्वीच नियतकालिकांच्या माध्यमातून ख्यातकीर्त कवी म्हणून त्यांची ओळख झाली, अशी उदाहरणे एकलव्यचे सदस्य आवर्जून सांगतात. म्हणून त्यांना कुणी नवोदित साहित्यिक म्हटलेले आवडत नाही. या चळवळीमुळे केवळ रिसोड परिसरातच नव्हे तर वाशीम जिल्ह्यातील साहित्य चळवळीला गती आली. साहित्य क्षेत्रात एकलव्यचे योगदान मोठेच आहे.
- विकास देशमुख, वाशीम
Vikas Deshmukh, Karda, Risod, Washim

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा